Thursday, July 3, 2014

छत्रपती शिवरायांचे वारस आहोत आपण! कधीही लाचार होऊ नका.


फक्त विचारवंत युवकांसाठी! 
मराठ्यांनो, शत्रूच्या मनात दहशत निर्माण करून स्वतःचे हक्क स्वकर्तुत्वावर मिळवणाऱ्या छत्रपती शिवरायांचे  वारस आहोत आपण! त्यांनी आपला हक्क लढून मिळवला, भिक मागून नव्हे. कुठल्याही फुकटच्या सवलतीसाठी लाचार होऊ नका, आपणामध्ये हिमत असेल, जिद्द असेल तर आपण पाहिजे ते मिळवू शकतो. 

आरक्षणाने आपल्या जीवनात काही फरक पडणार नाही. आपण मेहनत करून स्वतःचे कर्तुत्व सिद्ध करूया. आरक्षणाच्या कुबड्या घेऊन दुबळे बनू नका. प्रगत देशामध्ये मागास म्हणून जगू नका. 
पैशाने गरीब असलात म्हणून काय झाले? मनाने कधीही गरीब राहू नका. लक्षात ठेवा, जर कोणतीही गोष्ट कमी प्रयत्नात किंवा फुकट मिळाली तर त्या वस्तूची खरी किमत कळत नाही. त्यामुळे आरक्षणासारख्या दुबळ्या कुबड्या फेकून द्या. सामर्थ्यवान व्हा. 

मी जातीवर आधारित आरक्षणाच्या विरोधात आहे. जाती संपवायच्या असतील तर जातीनुसार आरक्षण देऊन कसे चालेल? एकीकडे बोंबा मारायच्या कि आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत, आणि दुसरीकडे जातीवादाला प्रमोट करायचे? वा रे वा सरकार! 

No comments:

Post a Comment